आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने सांगोला शहरास ४२ कोटी ३९ लाख ५ हाजार रुपयाचा निधी मंजूर.....
------------------------------------------------------------------------------------
सांगोला (दै.पंढरी नगरी न्यूज) सांगोला शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छ सौचालय मोहीम या योजने साठी केंद्र व राज्य सरकारचा ४२ कोटी ३९ लाख ५ हाजार रुपयांचा निधी आमदार डॉ .भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेला असुन..यातील केंद्र सरकारचे २० कोटी २५ लाख रुपये तर राज्य सरकारचे १८ कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजुर झालेले आहेत. यातील पहिल्या हप्त्याचे केंद्र सरकारचे ८ कोटी ९० लाख रुपये तर राज्य सरकारचे ७ कोटी २९ लाख रुपये आहेत. या निधीसाठी आमदार डॉ .भाई बाबासाहेब देशमुख यांनी वारंवार राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केलेला होता.. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी आमदार डॉ .भाई बाबासाहेब देशमुख यांच्या या मागणीला सकारात्मकता दाखवत योग्य ते सहकार्य केले आहे.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या मागणीला यश आले असुन या योजनेचा पहीला हप्ता १५ कोटी ३९ लाख रुपये तात्काळ नगरपालीकेला वितरीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत..या मध्ये केंद्र सरकारचे रुपये तर राज्य सरकारचे रुपये आसा पहीला हप्ता आहे.
सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरात स्वच्छता गृहे सुध्दा महत्वाची आहेत.याचा विचार करुन या योजनेतुन सांगोला शहराला निधी मंजुर करण्यात आमदार साहेबांना यश आले आहे.
या योजने अंतर्गत २७० प्रशस्त शौचालये बांधण्यात येणार असुन या मुळे नागरीकांची विशेषता महीलांची गैरसोय टाळली जाणार आहे.
सांगोला शहराचा सर्वांगीण विकास साध्य करीत असताना पाणि ,विज, स्वच्छता या बाबींकडे विशेष देणे गरजेचे असताना स्वच्छतेचा विचार केला असता स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत (नागरी) अंतर्गत सांगोला शहरासाठी मिळालेला निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे.येणाऱ्या काळात सांगोला शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनेतुन केद्र व राज्य सरकारचा अधिकचा निधी मंजुर करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले .लवकरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी मंजुर करुन आणन्याचे आश्वासन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतल्या ची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.